जगत असताना अनेकवेळा काही नाजुक नाती मिळून जातात. एकदम पारदर्शक असतात. मात्र दवबिंदुसारखी क्षणभंगुर नाही.. तर मनावर कोरली गेलेली असतात. या नात्यांना देवाचा आशीर्वाद असतो आणि आभाळाची सावली असते !!
ऐकतेस ना ?
नाती बनत असतात ग
वाती जळत हसतात ग
श्वासालाही भार असतो,
आरसे खोटे बोलतात ग !!
हातामधे हात कशाला
थरथर उगा नाचती ग
डोळ्यांमधे अधे मधे
ओले मोती साचती ग !!
नात्याला या नाही नाव
अनिकेत फ़िरते ग
श्वासामधे, भासामधे
ठेक्यामधे उरते ग !!!!
तुझी सय, ऐक सई
मना मधे येते ग....
गिरकी घेते, निळी सावळी
होत पाखरु.. गाते ग !!
नाही मोजमाप लावलं
तुझ्यामाझ्या नात्याला....
कशाला उगाच
शापायचय ग......
या.. देवाघरच्या मातीला ?
आंदण मिळाल्यावर गप राहवं....
उगाच प्रश्न कशाला....
उभे आडवे
वाकडे तिकडे
सवाल जबाब कशाला ?
Saturday, August 15, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
Chan re khup....thanks..;)
ReplyDeleteRahoolda....khup chan[:)]
ReplyDeleteअप्रतिम..
ReplyDelete