त्रेतायुगातही पाउस पडताना
टप टपच आवाज येयचा.....
पावसात फ़रक इतकाच
......................................की आज आपण भिजतो
......................................पूर्वी पुरूषोत्तम भिजायचा !!
जुन्या कवितांना कुरवाळताना
कवितेलाच मी कळायचो,
कविता वाचत असताना
डोळ्या मधुन गळायचो !
आज मलाच कविता कळते
अलगद पणे हातात येते,
इतकी बाजारू झाली आहे
ज्याचा त्याचा रंग घेते....!!
बदल कशात आहे..
तिच्यामधे का माझ्यामधे
पूर्ण होतच नाही ती
संपून जाते........ अधे मधे...!!
Saturday, August 15, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment